
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत. हे मृतदेह दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील आहेत. दोघांचीही कुटुंबे शेजारील घरात राहत होती. प्राथमिक तपासात सर्व मृत्यू विष पिल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेहाजवळून कीटकनाशकेही जप्त केली आहेत. आत्महत्येची ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक आत्महत्येचे कारण आर्थिक विवंचना असू शकते.

सकाळी उशिरापर्यंत गेट न उघडल्याने ग्रामस्थांना संशय आला.
दोन्ही भावांची कुटुंबे सहसा सकाळी लवकर उठत. मात्र आज सकाळी उशिरापर्यंत दोन्ही घरांचे दरवाजे न उघडल्याने ग्रामस्थांना संशय आला. यावेळी शेजाऱ्यांनी अनेक कुटुंबीयांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही फोनला उत्तर न दिल्याने काहीतरी अनुचित प्रकार घडल्याच्या भीतीने घराची झडती घेण्यात आली. यादरम्यान कुटुंबातील सर्व सदस्य मृतावस्थेत असल्याचे पाहून पोलिसांना कळवले.
कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते
आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबीय अनेक दिवसांपासून तणावाखाली असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही भावांनी अनेक लोकांकडून कर्जही घेतले होते. त्यामुळे कर्ज फेडण्याच्या दबावातून त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कुटुंबातील सदस्यांची नावे
आक्काताई वनमोरे (७२)
पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२)
माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९)
संगीता पोपट वनमोरे (४८)
रेखा माणिक वनमोरे (४५)
अर्चना पोपट वनमोर (३०)
शुभम पोपट वनमोरे (२८)
अनिता माणिक वनमोरे (२८)
आदित्य माणिक वनमोरे (१५)

