महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये बस उलटली, दोन ठार; 17 गंभीर जखमी

By Abhishek Raghuvanshi
2 Min Read

चंद्रपूर : आज मध्यरात्री महाराष्ट्रातील चंद्रपूरहून हैदराबादला जाणारी बस उलटली. चंद्रपूरमधील विरूर-धानोरा रस्त्यावर झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना विरूर, राजुरा, चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार सुरू होते. ही खाजगी बस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून निघाली होती आणि विरूर-धानोरा मार्गे हैदराबादला जात होती. मात्र थोडे अंतर गेल्यावर चालकाचा तोल गेला आणि बस उलटली.

अपघाताची माहिती मिळताच विरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले. काही जखमींना राजुरा तर काहींना चंद्रपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला झोप लागल्याने हा अपघात झाला. मात्र अपघाताच्या कारणाबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास व चौकशी सुरू आहे.

काय झालं, कसं झालं, कधी झालं, का झालं?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून एक खासगी बस हैदराबादला जाण्यासाठी निघाली होती. रात्री उशिरा बसमधील प्रवासी झोपेत असताना विरूर-धानोरा रस्त्यावर चालकाचा तोल गेला आणि बस उलटली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 17 ते 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

या अपघाताची माहिती मिळताच विरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बसमधून बाहेर काढून राजुरा आणि चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी प्रवाशांवर उपचार सुरू झाले आहेत. आतापर्यंत अपघाताचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांच्या अधिकृत वक्तव्याची प्रतीक्षा आहे. प्राथमिक माहितीनुसार, झोपेमुळे चालकाचा तोल गेला आणि हा अपघात झाला.

Exit mobile version