
या मान्सूनने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान केले. रत्नागिरी, अमरावती, पालघर हे जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. पावसामुळे जीवित व वित्तहानी होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील पिके भुईसपाट झाली.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने एकदा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी पालघरसाठी १५ आणि १६ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात कमाल आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
