
महाराष्ट्रातील लातूर शहरात जमिनीच्या आतून गूढ आवाज ऐकू आला पण भूकंपाची कोणतीही हालचाल झालेली नाही. बुधवारी सकाळी 10.30 ते 11.45 च्या दरम्यान विवेकानंद चौकाजवळ हे आवाज ऐकू आले, त्यामुळे रहिवासी घाबरले आणि भूकंपाची अफवा पसरली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की काही लोकांनी स्थानिक प्रशासनाला अलर्ट केले त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने लातूर शहरासह जिल्ह्यातील औरद शहाजानी आणि आशिव येथील भूकंपमापकांकडून माहिती घेतली, परंतु भूकंपाची कोणतीही हालचाल झाली नाही. 1993 मध्ये जिल्ह्यातील किल्लारी गाव आणि परिसरात भूकंप झाला होता, ज्यामध्ये सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला होता.
फेब्रुवारीमध्येच चार वेळा आवाज ऐकू आला
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकिब उस्मानी यांनी बुधवारी सांगितले की, मराठवाडा विभागात वेळोवेळी काही आवाज ऐकू येत आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये लातूर जिल्ह्यातील हासोरी, किल्लारी आणि आसपासच्या भागात तीन वेळा असे आवाज ऐकू आले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये जिल्ह्याच्या निलंगा तालुक्याच्या निटूर-डांगेवाडी परिसरात असे आवाज चार वेळा ऐकू आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
