ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत ‘महानंदा’वरून आक्रमक झाले आहेत. महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून पगार दिला नाही. महानंदा व्यवस्थापन विस्कळीत करण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे जमीन 27 एकर जमीन महानंदाचे या जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे. परजणे कोण आहेत? हे मंत्रिमंडळामधले कोणाचे मेहुणे, साडू, आहेत ते सांगावं.महानंदाचे 27 एकर जमीन एका लॉबीच्या घशात घालणं चालू आहे शिवसेना या सर्व गोष्टीकडे लक्ष आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवरूनही संजय राऊत यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना पगार मिळालेला नाही. सरकारकडे त्यांचा पगार द्यायला पैसा नाहीत? सरकारचा पैसा कुठे जात आहे? आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं राऊत म्हणाले.
