नाशिक : रविवारी सायंकाळपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, गहू आणि डाळिंब यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा आणि द्राक्ष या पिकांना लाखो रुपये खर्च करून विक्री तर कुठे काढणीला आलेले पीक भुईसपाट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त संजय चव्हाण स्वतः नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. कृषी मंत्री अचानक दौऱ्यावर आल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ झाली आहे. नाशिकच्या कसमादे परिसरात कृषी आयुक्त स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. यामध्ये आत्तापर्यन्त मिळालेल्या माहितीनुसार 34 हजार हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
कृषी आयुक्त संजय चव्हाण हे स्वतः नाशिकच्या विविध भागात जाऊन पाहणी करणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहून मदत बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही संजय चव्हाण यांनी म्हंटलं आहे. राज्यातील जवळपास 34 हजार हेक्टरवरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
सटाणा भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. यामध्ये कांद्याचे आणि द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. यामध्ये निफाडसह बाजूच्या तालुक्यात द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चांदवड आणि येवला तालुक्यात कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी लावलेले डोंगळे देखील खराब झाले आहे.
