मराठा आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. परंतु मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आपला वैयक्तीक मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध नाही. यासंदर्भात जेव्हा, जेव्हा ठराव आला, तेव्हा आपण हात वर केला आहे. तसेच शिंदे समितीचे काम संपले आहे. आता ही समिती बरखास्त करा, अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
शिंदे समितीचे काम संपले
शिंदे समितीची बरखास्त करण्याची मागणीसंदर्भात बोलताना म्हणाले की, मराठवाडा हा निजामांकडे होता. त्यावेळी तेथील लोकांनी मागणी केली की आम्ही मागसवर्गीय आहे. पण आमची कागदपत्रे तेलंगणात आहे. आता तेथील कागदपत्रे तपासली गेली. हा विषय फक्त मराठवाड्यापुरता होता. संपूर्ण महाराष्ट्रात हे काम करण्याची गरज नाही. आता राज्यात कुणबीसंदर्भात खोटे प्रमाणपत्र तयार केले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. यामुळे शिंदे समितीचे काम आता संपले आहे. समिती बरखास्त करण्यात यावी.
पोलिसांवर हल्ले मग आपले काय
आपल्यावर हल्ले होत आहे? याप्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यावर हल्ले झाले त्यापेक्षा पोलिसांवर हल्ले झाले, हे महत्वाचे आहे. महिला पोलीस जखमी झाले. पोलीस सध्या हातबल झाले आहे. कारण जखमी झाल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे राज्यात पोलीसच सुरक्षित नसतील तर इतरांचे काय? आता पोलिसांना विश्वास देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे काम करा, असे पोलिसांना सांगणे गरजेचे आहे. बीडमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला, हे तपासण्याची गरज आहे. जनतेपुढे पहिली बाजू आली नाही. त्याला पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री जबाबदार आहे.
संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आपणास मोठा आदर आहे. त्यांचा पूर्ण महाराष्ट्र आहे. एखाद्या घटकाकडे त्यांनी पाहू नये, अशी आपली हात जोडून त्यांना विनंती आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
