आता दिवाळीचे दिवस सुरु झालेत. घरोघरी, बाजारपेठांमध्ये दिवाळीची उत्साह दिसून येतोय. दिवाळीतही राजकीय पक्ष प्रचाराची एकही संधी सोडत नाहीत. पुढच्यावर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत. दरम्यान दिवाळी संपल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडणार आहे. सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकीय प्रचार जोर पकडणार आहे. भाजपाने आतापासूनच त्याची मेगा प्लानिंग सुरु केलीय. दिवाळी संपताच लोकसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. भाजपचे बडे नेते मैदानात उतरणार आहेत. नुकताच राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीतील आकडे भाजपाचा उत्साह वाढवणारे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला पसंती दिली. भाजपने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं.
भाजपाचे बडे नेते आता थेट ग्राऊंड लेव्हलवर उतरुन कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याची आखणी भाजपाने केली आहे. भाजपा मतदारांना साद घालणार आहे. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. देशात तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रात भाजपाने मिशन 45 ची आखणी केली आहे. महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट्य आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजपासोबत आहे.
काय आहे भाजपाच मेगाप्लानिंग?
दिवाळी संपल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा दौरा सुरु होईल. ओबीसी जनसंवाद यात्रेतून बावनकुळेंचा दौरा असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जानेवारी नंतर मैदानात उतरणार आहेत. ‘महाविजय 2024’ यात्रेच्या माध्यमातून मतदारांना साद घालतील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात फडणवीस दौरा करणार आहेत. प्रत्येक खासदाराकडून मतदारसंघात जनसंवाद आयोजित करण्याचे नियोजन आहे. स्थानिक खासदार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा ट्रिपल फिल्टर मतदारांना साद घालतील. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मेगाप्लानिंग आहे.
