महाराष्ट्रातील सोलापूर येथे सोमवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात चार जण ठार तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. येथे प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मालवाहू ट्रकने धडक दिली. अपघाताच्या वेळी ट्रॉलीमध्ये सुमारे 22 जण होते. हे सर्वजण एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावाजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये सर्वजण तुळजापूर येथील रहिवासी होते. या अपघातात तुकाराम सुदाम शिंदे (13), भागाबाई जरासंद मिसाळ (60), जरासंद माधव मिसाळ (70) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (14) यांचा मृत्यू झाला.
मृतांची संख्या वाढू शकते
पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. अपघात एवढा भीषण होता की, धडकल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचा चक्काचूर झाला. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
परभणीत भीषण अपघात
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणाजवळ रविवारी भीषण अपघात झाला. येथे बस आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अतीक रफिक तांबटकरी, शेख अमीर शेख नजीर आणि शेख मोबीन शेख खालिद यांचा समावेश आहे. हे सर्वजण सेलू येथील रहिवासी आहेत.
