
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गजबजलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या दोन दिवसांत झालेल्या दोन रस्ते अपघातात एकूण सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. सोमवारी रात्री उशिरा तलसरी तहसीलच्या आमगाव गावात मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकून एका टेम्पोला धडकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातात कारमधील तीन प्रवासी आणि टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे तलसरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळाजवळ मंगळवारी दुपारी अशाच अन्य एका अपघातात कार टेम्पोला धडकली. या अपघातात कारमधील दोघांना आपला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी दोन्ही अपघातांसंदर्भात भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
